Friday 15 April 2011

"लोकमत" ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला.......!

 
ज्या शहिदांचे फक्त नाव घेता आम्हा सर्वांचे हृदय अभिमानाने भरून येते....ज्यांच्या अपूर्व त्यागाचे  गोडवे आम्ही आज हि गात असतो........ज्यांच्या असीम त्यागामुळे आम्ही आजच्या स्वतंत्र राष्ट्रात राहतो...त्यांच्या प्रती आम्ही .....आमचे नेते.....आमचे सरकार किती उदासीन आहे....याचा प्रत्यय बऱ्याचदा आलेला आहे.....तरी  कोणालाही जाग येत नाही. ज्यांनी हसत -हसत घरादारावर विस्तव ठेऊन उभ्या आयुष्याला देशासाठी कुर्बान केले....त्या शहीद क्रांतीवीरांप्रती आम्ही एवढे उदासीन.....एवढे कृतघ्न का झालो? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. जालियान वाला बाग हत्याकांड चा जनक जनरल डायर ची हत्या करून बदला घेणारे शहीद उधमसिंग इतिहासाच्या पानावर आम्ही वाचतो....त्यांच्या त्या कृतीचा व त्यागाचा आम्ही गौरव करतो....त्यांचेच  वारस जितसिंग आणि त्यांची मुले अत्यंत काबाडकष्ट करीत जीवन कंठीत आहेत.....मोलमजुरी त्यांच्या नशिबी आलेली आहे........उधमसिंग यांचा आत्मा कधीही अपेक्षा करणार नाही .....ज्यांनी या देशासाठी सर्वस्व अर्पिले ते कोणती अपेक्षा करणार..? पण हे आमच्या नेत्यांचे....सरकारचे आद्य कर्तव्य होते कि त्यांनी कृतज्ञता म्हणून शहीद उधमसिंग यांच्या वारसांची दखल घ्यायला हवी होती.....! ज्या देशात एकेका चौकार आणि सत्कार साथी लोकहो रुपयांची खिरापत वाटली जाते.........मंत्री-संत्रींच्या सत्कार व सुरक्षेवर करोडो रुपये खर्चिले जातात....श्रीमंतांच्या चंगळ वादी जीवनशैलीवर धनाची बरसात केली जाते.....त्याच देशात या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांच्या वारसांची.....सीमांचे रक्षण करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबियांची अशी हि परवड व्हावी हि बाबच शरम आणणारी आहे.....! 
सर्वत्र कृतघ्न मंडळीचा संचार झाला.......भ्रष्ट ...नतद्रष्ट मंडळींचा वावर झाला......जणूकाही अंधार झाला.....आमच्यातील माणुसकी आटली असे वाटू लागले.  थोड्या थोड्या बाबींवरून ......इतिहासातील घटनांवरून.....रस्त्यावर उतरून आजही आकांड-तांडव करणारे तथाकथित लोक हि या विषयावर गप्प राहिले हि बाबच मोठी खेदजनक आहे......तरीही ह्या परीस्थित दैनिक लोकमत ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला......शहीद उधमसिंग यांचे वारस जितसिंग यांचा सुमारे अकरा लाख रुपयांची मदत करून गौरव केला.....शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा मोठा आधार दिला...हि बाब आशादायी आहे. दै.लोकमत चे प्रमुख श्री विजयजी दर्डा यांनी स्वत: लक्ष घालून हे कार्य तडीस नेले त्याबद्दल या देशातील तमाम देशप्रेमी जनता त्यांचे आभारी आहे.......दैनिक लोकमत चे हे कार्य स्वर्गीय बाबूजी च्या देशप्रेमाची आठवण जरूर देते.........दैनिक लोकमत चे त्रिवार अभिनंदन.......!

No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...