Wednesday 6 April 2011

आफ्रिदीचे ऐसे बरळणे दळभद्री ......!

नुकताच भारत -पाक सामना झाला.....दोन्ही देशातील जनतेने आणि नेत्यांनी  ह्या सामन्याचा आनंद लुटला......दोन्ही बाजूनी स्वप्नाळू आणि आशावादी लोकांनी (ज्यांना व्यर्थ वेळ आणि पैसा खर्च करण्याची हौस असते.....त्यांच्या खिशातून जात नाही म्हणून....!) चर्चेची गुऱ्हाळे सुरु केली. ''येरे माझ्या मागल्या अन शिळ्या  भाकरी चांगल्या'' ह्या  उक्तीनुसार पुन्हा पुन्हा तेच व्यर्थ प्रयोग करण्यात ह्या मंडळीना फार उत्साह येतो असे म्हणतात...!  असो....भारताने पाक ला पराभूत केले.....पाहता पाहता लंका हि सर केली आणि विश्व कप  हि जिंकला....!
वृत्तपत्रे.....दुरचित्र वाहिन्या आणि कट्टे-तट्टे आदींवर शिमग्या नंतरचे  कवित्व हि सुरु झाले......!
ह्यात कडी कि काय ज्याच्यावर आम्ही एक गुणी खेळाडू म्हणून अपार प्रेम केले.....त्या आफ्रिदी नामक व्यक्तीने अकलेचे तारे तोडले आणि अलम दुनियेत त्यावर रकाने भरून निघाले.....माध्यमांना वैरण मिळाली.
भारताकडून सपाटून मार खाल्यावर म्हणे ह्या आफ्रिदीने पाक ला परत गेल्यावर भारत देशाबाबत पाकी मानसिकतेत एव्हढा राग का आहे असे विधान केले.....त्याच्या ह्या विधानावर आमच्याकडील स्वप्नाळू मंडळीना हि जाम आनंद झाला....आफ्रिदीच्या खिलाडू वृत्तीवर स्तुतिसुमने उधळली जाऊ लागलीत. काही सज्जनांनी तर उभय देशात सौहार्द निर्माण करण्यासाठी हा आफ्रिदी मोठा दुवा ठरेल असे भाकीत हि वर्तवल्याचे एकण्यात आले............त्याचे हे विधान ऐकून उभय देशातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात आफ्रिदी बद्दल आदर निर्माण झाला....नाहीतरी आम्ही भारतीय हीच भावना बाळगत  आलेलो आहोत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. खेळ आणि खिलाडू वृत्ती जगाने भारताकडून शिकावी असे लिहिण्याचे  धाडस हि आम्ही  करतो. आफ्रिदी बद्दल अभिमान वाटू लागत असताना त्याने दुसर्याच दिवशी पुन्हा गजहब केला...... म्हणाला कि भारतीय लोकांचे "दिल"  कुंठीत आहे....."जगात फक्त पाक च्या लोकांचे मन पाक आहे आणि बाकीचे खुजे आहेत असा साक्षात्कार ह्या आफ्रिदी नामक प्राण्याला झाला...!." आफ्रिदीने तोडलेल्या ह्या अकलेच्या ताऱ्याना गटारीत पडताना पाहून उभय देशातील स्वप्नाळू मंडळी चिंतीत  झाली......भारत -पाक बोलणी पुन्हा फिसकटतील  कि काय अशी शंका ह्या मंडळीस वाटू लागली. आफ्रिदी च्या ह्या पाक-वाक्यांचे समस्त पाकी जनतेने वर्ल्ड कप मधील पराभव विसरून तहे-दिल से स्वागत हि केले आणि आपल्या  असली मानसिकतेची पहेचान अलम दुनियेस दिली......आपल्या कडील गावातल्या पारावरच्या गप्पांमध्ये हि  "कुत्र्याचे शेपूट ते वाकडेच.......!" अशा म्हणीना उजाळा दिला गेला.
भारतीय "दिल" चा असा साक्षात्कार ह्या आफ्रिदीला कसा झाला ह्याचे कुतूहल वाढू लागले......!
ह्या भारतात येऊन भारताचा अनेकदा पाहुणचार घेऊन हि माशी कोठे शिंकली असा सवाल अनेकांना पडला. अरे आफ्रिद्या जर भारताचे "दिल" छोटे राहिले असते तर पाक च्या लोकांचे नापाक कदम आमच्या पवित्र धरतीवर कधी पडले नसते.....अरे ह्या भारतात अझर कप्तान होता....कलाम साहेब राष्ट्रपती होते.....जाकीर हुसेन, ए.आर.रहेमान, सलमान खान,शाहरुख खान,आमीर खान ,दिलीप कुमार सारख्या लोकांना डोक्यावर घेतले जाते.....असे तुझ्या पाक मध्ये आहे का...? उलट अल्पसंख्य हिंदुना हुसकून लावण्यासाठी दंगली माजाविल्या जातात...तेव्हा तुझे तथाकथित "दिल" कोठे जाते?   अरे हि मंडळी तर आमची आहे...आमच्या देशाची नागरिक आहे......तुझ्या पाक मधील सलमा आगा, गुलाम आली, मेहंदी हसन, नुसरत फतेह आली खान, अदनान सामी इ. कलाकार मंडळीस तुझ्या देशापेक्षा जास्त मन-सन्मान,पैसा,प्रतिष्ठा ह्या भारतामध्ये मिळाली....तरी हि म्हणतोस आमचे "दिल" छोटे आहे...? 
ह्या आफ्रिदीच्या वल्गना ऐकून चोहीकडे मिडिया ने गजहब केल्यावर म्हणे त्याला पश्चाताप झाला व मी असे बोललोच नाही.....सारा विपर्यास मिडिया वाल्यांनी केला ....! आता बोला? काय बोलणार....? म्हणा  " बोलाचाच  भात आणि बोलाचीच कढी.......... !"

No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...