नुकतीच अन्न हजारेंच्या उपोषणाची दिल्लीत सांगता झाली. जनतेने जय-जयकार केला....मिडिया ने सारे कव्हरेज टिपण्याचा अथक प्रयास केला.....कट्ट्या-तट्यावर चर्चांना आलेले उधान शमू लागले......स्वत:ला समांतर शासन अथवा न्यायालय समजू लागलेल्या तथाकथित पत्रकार....संघटना आदी मंडळी जाम खुश झाली.शासनकर्त्या जमातीने हि अखेर नि:श्वास सोडला.अन्न राळेगण सिद्धी ला परतले...जंगी स्वागत मायभूमीत झाले....अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठी गड्याने साक्षात दिल्ली हलवून सोडण्याचा आनंद अपूर्व असाच आहे...असो.
पण म्हणतात न कि काही चांगले झाले कि ते आपल्यातीलच काहीना सहन होत नाही म्हणून....! उपोषणाच्या बातम्यांच्या रिक्त रकान्यात समस्त मिडिया जगत नव्या बातम्या शोधीत असताना आमच्याच समाजसेवी मंडळीनी हि अडचण हि पूर्ण केली. निमित्त ठरले ते नरेंद्र मोदी व नितीशकुमार यांच्या वर अण्णांनी स्तुतिसुमने उधळली त्या गोष्टीचे आणि समस्त --नेमस्त मंडळी नाखूष झाली.....नेमस्त मंडळीने हि मिडिया समोर आपली भडास मोकळी केली.....!
सामान्य माणसाला प्रश्न पडला....अण्णांचे काय चुकले? कालपर्यंत अण्णा हजारे यांच्या पाठीशी मेधाताई पाटकर, मल्लिका साराभाई, अरुणा रॉय, संदीप पांडे, कविता श्रीवास्तव इ. मंडळी होती. ह्या मंडळी बाबत ...त्यांच्या समाज-सेवेबाबत समस्त दुनियेत आदर आहे ह्यात शंका नाही. मग हि मंडळी खप होण्याचे कारण काय?
शांतीभूषण---प्रशांत भूषण ह्यांच्या समावेशाबाबत बाबा रामदेव ह्यांनी शंका उपस्थित केल्यावर ह्या मंडळीने बाबा रामदेवजी वर ताशेरे ओढले होते. आता हीच मंडळी अण्णा हजारेंवर ताशेरे ओढीत आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार ह्या नेत्यांनी आपल्या राज्यातील ग्रामविकास ज्या गतीने केला आहे त्यास संपूर्ण देशात तोड नाही. साहजिकच अण्णा हजारेनी त्यांची तारीफ केली ...ह्यात वावडे ते काय? पण उपर निर्दिष्ट समाजवादी मंडळीस मोदी आणि नितीशकुमार ह्यांचे भारी वावडे आहे.........हि मंडळी जिवंत आहे हे देखील ह्या लोकांना खटकत असेल असे मला वाटते....! हे स्वत:स समांतर न्यायालय समजू लागले आहेत कि काय? .ह्या देशात कोण चांगले आणि कोण वाईट हे प्रमाणपत्र ह्या मंडळीने वाटण्यास सुरुवात केली कि काय अशी शंका वाटू लागलेली आहे. एकंदरीत एवढा संकुचित दृष्टीकोन ह्या उभय मंडळींकडून देशाला व पर्यायाने जनतेला अपेक्षित नाही. हि दांभिकता नाही काय.....?
No comments:
Post a Comment